Sunday, May 29, 2016

Hi Sir, Hope your doing well. Sir, I have been a very loyal customer of your company but my recent experience with your company has not been great. On 25th May I received an email from your company stating I would get a 10% cashback on all my orders placed from 25th to 27th May 2016 if I use a Citibank debit/credit card. So, I got very excited as I had to purchase certain electronic items. On 27th May 2016 I placed my order worth approximate INR48,000/- but to my surprise the Cashback amount was just INR2000/- which is not even 5% of my total order value. So the next day I called your contact center and the person on the other side was very helpful and patient. He spent a good amount of time to investigate the issue and advised me that I should be getting more than INR2000/- and apologized stating there should have been a system glitch involved for this miscalculation. He asked me to be rest assured as he was sure that his backend team would be able to sort the issue out and get me the actual 10% cashback amount. After few hours I got an email stating I would get my 10% cashback on 08th Aug 2016 and the amount would be INR2000/-. I immediately replied to the email with my concern but till now after a lot of back and forth your team has not been able to help me out. I know you are a very busy man but could you please be kind enough to ask someone to look into the matter and help me get my actual 10% cashback (approximate INR4700/-). I have been your customer for years and done a lot of business with you. Order id:OD406122792089674001 Incident Id:IN1605281027304607368 Thanking you in anticipation. Sunil D'Mello.

Friday, June 8, 2012

प्रियसंदीपसर, २० फेब्रु. २०११ आपण आपले विचार आम्हा भारतीयापर्यंत पोचवण्यासाठी हे पुस्तक लिहिले म्हणून आपले आभार आणि ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून ते मराठीत लिहिले म्हणून त्रिवार अभिनंदन!!! "आपल्या देशाचे काय होणार?", "आपला देश ह्या राजकारण्यांनी उद्योजकांना विकायला काढला आहे", "सर्व राजकारण्यांना एका लाईनीत उभे करून गोळ्या घालायला पाहिजेत" असे हतबलतेचे आणि उच्च निराशा व्यक्त करणारे उदगार आम्ही सामान्य लोक नेहमी काढत असतो पण कधी विचार करत नाही की "मी" ह्या बाबतीत काय करू शकतो, हा देश इतर विकसित देशांबरोबर येण्यासाठी मी आजपर्यंत काय केलंय? अनेकदा इच्छा असूनही, खूप काही करावेसे वाटूनही योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य दिशा सापडत नाही. आपले हे पुस्तक अश्या ह्या भरकटलेल्या नौकांसाठी दीपस्तंभाचे काम करेल अशी मला खात्री आहे. आपले पुस्तक म्हणजे देशाला ओरबाडून खाणाऱ्याना एक सणसणीत चपराक आहे, स्वतः काही ना करता फक्त टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी एक झणझणीत अंजन आहे. ह्या पुस्तकात आपण फक्त आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे विवेचन करून अथवा पुढील ५०० ते ६०० वर्षात काय होईल हे सांगून थांबला नाहीत तर ही परिस्थिती आपणास कशी बदलता येईल याचे सोदाहरण विवेचन केले आहे. आपण इतर विचारवंताप्रमाणे फक्त पुस्तकी ज्ञान देऊन थांबला नाहीत तर "Strategic Foresight Group" च्या माध्यमातून त्याला कृतीची जोडदेखील दिली आहे. मी ऐतिहासिक आणी सामाजिक आशयाच्या काही कादंबऱ्या वाचल्या आणी त्यांचा आवाका पाहून माझी छाती दडपून गेली होती पण आपले पुस्तक वाचले आणी माझी मतीच गुंग झाली. जगातील जवळ जवळ सर्वच प्रमुख देशांबद्दल तुमचा अभ्यास आणी त्यांच्या विकासाबद्द्दलची तुमची माहिती पाहून अचंबा वाटतो. आपण केलेला अभ्यास आणी त्या आधारे मांडलेली मते आणी सिद्धांत यांना तोड नाही, भारताला जर का खरोखरचा विकास करावयाचा असेल तर आपले विचार आम्हा सामान्य भारतीयांनी कृतीत आणणे आवश्यक आहे. आपण पाकिस्तान सरकार आणी लष्कराबद्दल जी मते मांडली आहेत ती अगदी योग्य आहेत, वास्तविक आपल्यासारखे जागतिक स्तरावरचे विचारवंत अशी मते उघडपणे मांडताना दिसत नाहीत. आपण केवळ आपली मते परखडपणे मांडलीच नाहीत तर सोदाहरण पाकिस्तानी लष्कराचा दुटप्पीपणा सिद्ध केला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर मागील दाराने दहशतवाद्यांना रसद पुरवीत राहील तोपर्यंत त्यांच्या दिवाणखान्यात बसून चर्चा करून भारत सरकारला काहीही सध्या होणार नाही. अश्या या बोटचेप्या व गुळमुळीत धोरणांनी काश्मीर आणी पर्यायाने दहशतवादाच्या प्रश्नांची उकल होणार नाही. जागतिक राजकारणात आणी पर्यायाने नेत्यांत असलेला दरारा, जागतिक घडामोडींचा असलेला प्रचंड अभ्यास व जवळपास ५० राष्ट्रअध्यक्ष्यांशी केलेल्या सल्ला - मसलती असे सर्व राष्ट्रोपयोगी भांडार आपणापाशी असूनदेखील भारत अथवा महाराष्ट्र सरकारने आपला फारसा उपयोग केलेला दिसत नाही हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव आहे. नजीकच्या काळात त्यांना जगातील इतर राष्टांप्रमाणे सुबुद्धी सुचेल आणी आपल्या ज्ञानाचा आणी दूरदर्शी विचारांचा फायदा आपल्या देशालाही होईल अशी आशा धरतो. देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी असणाऱ्यांना मात्र योग्य दिशा सापडत नसणाऱ्या माझ्यासारख्या तरुणांना हे पुस्तक नक्कीच "एका दिशेचा शोध" घेण्यास मदत करेल आणी आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल. सुनिल बावतीस डि'मेलो वसई

Wednesday, December 29, 2010

Some photos


Mirror Image



New Born



Two Fishermen

Friday, July 23, 2010

बोलीभाषेचे संवर्धन व्हावे!!

आजकालचा जमाना हा "भाषा आणि संस्कृती बचाव" वाल्यांचा आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रांतात त्या त्या ठिकाणची भाषा व संस्कृती वाचविण्यासाठी सामाजिक चळवळी सुरु आहेत. आपल्या महाराष्ट्रात तर या चळवळीनी राजकीय रूप धारण केले आहे. मराठी भाषा आणि संस्कृती बचावच्या नावाखाली काही राजकीय पक्षदेखील उदयास आले आहेत आणि त्यांना लोकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे. राजकीय पटलावर त्यांची दखल घेतली जात आहे.
हे राजकीय पक्ष प्रत्यक्ष काय करताहेत ह्यापेक्षा ते कोणत्या हेतूने आणि जाणीवेने निर्माण झाले आहेत अथवा करण्यात आले आहेत हे अभ्यासणे महत्वाचे ठरेल. मराठी भाषा - संस्कृती वर आक्रमणे होत आहेत. मराठी भाषेचा शुद्धपणा कमी होत चाललेला आहे ही बाब जरी खरी असली तरी ह्याला जबाबदार मराठी माणसेच आहेत. जेव्हा मराठी माणूस महाराष्ट्रात (मुंबईत नव्हे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे) देवाणघेवाणीसाठी मराठी सोडून इतर भाषा वापरू लागला तेव्हापासूनच मराठीला ही दुरावस्था आली. महाराष्ट्रातील व्यापारी व दुकानदार हे मुख्यतः बिगर मराठी आहेत आणि त्यांना इथली स्थानिक भाषा शिकण्यास भाग पाडण्याऐवजी मराठी माणसेच त्यांची अथवा हिंदी भाषा बोलावयास लागल्याने त्यांचे चांगलेच फावले. पर्यायाने मराठी माणसे व मराठी भाषा व्यवहारात मागे पडत गेली. आता तर मराठी व्यावहारिक भाषा म्हणून गणलीदेखील जात नाही.
हा मराठी भाषेचा परामर्श एवढ्यासाठी घेतला कि मराठी माणसांनी जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती आपण वसईकर करत आहोत. आज आपण आपल्या बोलीभाषेत (कादोडी, वाडवळ, भंडारी) संभाषण करताना कितीतरी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा राजरोसपणे वापर करतो. आपण जे इतर भाषिक शब्द वापरतो त्यासाठी आपल्या भाषेत असणारा शब्द माहित असूनदेखील आपण तो उच्चारण्याचे टाळतो व आपणहून आपल्या भाषेचा विटाळ करतो. मागील पाच - सहा वर्षात मोजदाद करण्यापलीकडे परभाषिक शब्द आपल्या भाषेत ठाण मांडून बसले आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे बोलीभाषेच्या अशुद्धीकरणाची ही चळवळ आपणच हाती घेतली आहे.
काही तथाकथित समाजसुधारक जे नेहमी बोलीभाषा टिकली पाहिजे, ती मोठ्या प्रमाणात वापरली गेली पाहिजे म्हणून भाषणे देतात आणि नियतकालिकात मोठमोठाले लेख लिहितात तेच जेव्हा आपापसात मराठीत बोलताना दिसतात तेव्हा त्यांची कीव येते. जेव्हा दोन सामवेदी बोलीभाषिक एकत्र येतात तेव्हा त्यांनी आपल्या बोलीभाषेतच संभाषण करावे. जेव्हा कोणी इतर भाषिक सोबत असेल तेव्हा मराठी भाषा वापरावी पण कोणी मराठी भाषेस नवखा असेल तर जरूर हिंदी भाषेचा वापर करावा. मात्र त्यास आपली अथवा मराठी भाषा शिकण्यास प्रवृत्त करावे. संभाषणात प्राधान्यक्रम, प्रथम बोलीभाषा नंतर मराठी आणि गरज भासल्यास राष्ट्रभाषा हिंदी असा असावा.
इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्यांना आणि काही समाजसुधारकांना असे वाटते कि संभाषणात काही इंग्रजी आणि हिंदी शब्द घुसवले म्हणजे आपली भाषा फार उच्च झाली, प्रगत झाली; पण हा त्यांचा पोरकट विचार अनेकदा हास्यास्पद संवादात रुपांतरीत होतो. आपल्या भाषेतील शब्द सोयीस्कररित्या वगळून त्याजागी विनाकारण मराठी शब्द वापरले जातात हे आपणास खालील उदाहरणावरून कळेल.

कादोडी शब्द मराठी शब्द
कुण्यात - भावजी
स (६) - सहा
दा (१०) - दहा
हाकोटे - सकाळी
हांचापारा - संध्याकाळी
हा - होय
हिनवार - शनिवार
हव्वार - सोमवार

वानगीदाखल दिलेले वरील शब्द जरी कमी वाटत असले तरी त्यांचा व इतर शब्दांचा वावर आपल्या बोलीभाषेत भरपूर प्रमाणात वाढला आहे व त्यामुळे आपली भाषा पोखरली जातेय तिचे मूळ सौंदर्य नष्ट होत चाललेय. हे सर्व थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी आपल्या शुद्ध बोलीभाषेतूनच संभाषण करावयास हवे.
आई - बाबा कामाला जात असल्याने दिवसभर आजी - आजोबांच्या सानिध्यात असणारी लहान मुले खूप वेळेला अगदी शुद्ध कादोडी शब्द वापरताना दिसतात मात्र मोठे झाल्यावर त्यांना त्या शब्दांचा विसर पडतो व ती देखील आपल्याप्रमाणे कीड लागलेली व पोखरलेली भाषा बोलू लागतात.
जर आपण २० वर्षांची राजकीय गुलामगिरी झुगारून देऊ शकतो तर ही भाषिक गुलामगिरी का म्हणून झुगारु नये. आपल्या भाषेवरील आक्रमणाचा वेग इतका आहे की आपणास "कादोडी नवनिर्माण सेना" स्थापवायासही वेळ मिळणार नाही.

सुनील बावतीस डि'मेलो
वटार - बारोडी

स्वाभिमानी वसईकरच्या जुलै २०१० अंकांतून साभार...

Friday, May 21, 2010

घेऊन हाती मशाल क्रांतीची!

घेऊन हाती मशाल क्रांतीची
घालू पालथी अवघी पृथ्वीची,

राजा कुणी ना रंक आता
ह्या तर झाल्या जुन्या बाता,

सान-थोर सारे एक जमू
एकच ध्यासाने आता लढू,

बाजूला ठेऊ सारे पोथी पंथ
आणू एकत्र सारे साधू संत,

राग कुना ना कुणास रुसवा
बासनात आता हो मतभेद वसवा,

तमा न बाळगू आता कुणाची
घराणेशाही राजकारणाची ना पोपटपंची नेत्यांची,

एकदिलाने एकजुटीने आता पुढेच जाऊ
ध्येयप्राप्तीशिवाय न आता माघारी येऊ.

Tuesday, April 27, 2010

इंडिअन प्रिमीयर लौंड्री की चमकार!

पवार की गोदी मे बैठा मोदी
उसकी लीला इतनी अनोखी,
दुबई - मौरीशस की सारी काली संपत्ती
इंडिअन प्रिमीयर लौंड्री मे उसने सफेद करवाई.

सफेदी की इस चमकार रे इंडिया उजल गई,
डॉलर के ये आकडे देख आम आदमी की तो मती मर गई.

थरूर की जो नियत बिगड गई
दिल्ली छोड उसने कोच्ची मे अपनी नैया डूबोई,
और दौलत की इस होड मे
अपनी नौकरी भी गवाई.

राजनीती की गांज तो मोदी पर भी गिरनी थी
आई.पी.एल. से छुट्टी की खबर उससे भी दूर न थी,
मगर मियां गिरे तो भी टांग उपर
कहते है हम ही है आई.पी.एल. के गजोधर.

महाराष्ट्राला १ कोटीचा पुरस्कार!

पंचायतराज अंमलबजावणीसाठी केंद्राकडून दिल्याजाणाऱ्या पुरस्कारात महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लागल्याचे वृत्त वाचून सखेद आश्चर्याचा धक्का बसला (आता माझ्या महाराष्ट्राला पुरस्कार मिळूनदेखील मला खेद का झाला याचा तुम्हाला धक्का बसला असेल, त्याचे कारण तुम्हास कळेलच).
राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. जयंत पाटील व ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे यांनी हा एक कोटी रुपयांचा पुरस्कार स्वीकारताना आपण खरोखरच या पुरस्काराचे धनी आहोत का? आपण त्यासाठी लायक आहोत का याचा विचार केला असेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल.
वसई तालुक्यात मागील काही महिन्यांपासून ५३ गावांचे जे जन आंदोलन सुरु आहे त्याला ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभांचाही आधार आहे. वसई - विरार भागातील काही नगरपालिका मिळून जी महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये बेकायदेशीररीत्या ५३ गावांचादेखील समावेश करण्यात आला होता, त्या ५३ पैकी ४९ गावांनी आपापल्या ग्रामपंचायतिंमध्ये ग्रामसभाद्वारे यावर आक्षेप घेतला होता व महानगरपालिकेत होणाऱ्या समावेशाला विरोध दर्शवला होता, असे असतानादेखील शासनाने आडमुठेपणाचे धोरण अवलंबून व कायदेकानून - नियम धाब्यावर बसवून जनमताविरुद्ध महानगरपालिका या गावांवर लादली होती. नंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर सरकारला झुकून आपला निर्णय मागे घ्यावा लागला असला तरी त्याअगोदर या सरकारने राजकारणातील सर्व डावपेच पणाला लावून हे जनआंदोलन चिरडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ५ मार्च २०१० चा अमानुष लाठीहल्ला सर्वश्रुत आहे.
ग्रामसभांचे निर्णय पायदळी तुडवून व पंचायतराज न जुमानता लोकांवर अन्यायकारकरित्या आपले निर्णय लादणाऱ्या अशा या सरकारला कोणते निकष लावून असे हे पुरस्कार दिले जातात हे एक प्रश्नचिन्हच आहे.
आता या पुरस्काराची लाज ठेऊन सरकारकडून वसईवर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती अन्यत्र कुठे होणार नाही अशी आशा बाळगूया (की नको?).

Thursday, April 22, 2010

Hard wallet in your back pocket can be harmful!!



Hard wallet in your back pocket can be harmful!!

Keeping a hard wallet in your back pocket for long hours can be very harmful especially if you are seating on hard surface. Normally guys keep a lot of other stuff in their wallet as they do not carry a bag with them like girls. They keep the driving license, bus tickets, parking tickets, movie tickets, bills etc. in the tiny wallet which makes it big, fat and hard. Many wallets have a specially designed pocket to keep the coins which makes it even harder. If a person keeps such a hard wallet in the same back pocket for hours then it affects the blood circulation in that part of the body. It can develop a blood clot in that area which is your butt.

One of my friends used to use a very hard and big wallet. He used to travel for three and half hours on a hard seat of local trains everyday. He was working with an online trading firm which needed him to sit for long hours in the office. He has developed a blood clot on his right butt which makes it difficult for him to sit or even sleep. Doctor has given some medicine and has kept him under observation, if the clot doesn't melt by the medicines then he will have to be operated.
To avoid being in such a situation, please keep your wallet in your shirt's pocket or keep it on your desk while working or travelling. Also try to keep your wallet as light as you can.

Friday, April 16, 2010

वसईवरचा लाठीहल्ला!


माझं एक काम करशील
त्यांना जाऊन एक विचारशील,

अरे आवडतच होत्या साड्या एवढ्या
तर मागून घायच्या होत्या नवीन आणून दिल्या असत्या,
माझ्या आया - बहिणींच्या नेसत्या साड्या का म्हणून फेडल्या?

भावतात तुम्हास एवढ्याच बांगड्या
तर बोलावला असता एखादा कासार आणि भागवली असती हौस तुमची
पण माझ्या आया - बहिणींची मनगट का म्हणून मोडलीत?

आवडतो तुम्हास एवढा लाठीमार कि घरा-घरात घुसून तुम्ही केलंत रणकंदन,
दिल्या असत्या तुम्हास जुन्या गोधड्या; खुशाल बडवा हव्या तेवढ्या.

लाचारीची भाकरी एवढी का आवडली?
तुम्ही तर शौर्याची परीसीमाच गाठली
कुत्र्यांची ही कोणती जात निघाली ज्याने लांडग्यांना सोडून
शेळ्यावरच झडप घातली

नक्कीच यासाठी विशेष ट्रेनिंग असेल
आणि त्यावर लक्ष लक्ष खर्चही आला असेल
बाकी तुमच्या management चे मात्र कौतुक करावेसे वाटते
अचूक वेळ साधून, टार्गेट पूर्ण करून
पसार कसे व्हावे
हे तुम्हाकडून शिकावेसे वाटते.

Thursday, April 15, 2010

जावळीच्या मोऱ्याचा आधुनिक अवतार, नंदकुमार जावळे!

नंदकुमार जावळे यांचा ११ एप्रिलचा लेख वाचला, लेख वाचून लेखकांची कीव आली. वसई परिसर हे काही एक छोटे गाव नाही जिथे १०-१२ लोक फिरून बंद जवळपास १००% पर्यंत यशस्वी होईल. माननीय आमदार विवेकभाऊ पंडित आणि इतर आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ ती एक उस्फुर्थ जन-प्रतिक्रिया होती.
लेखक सांगताहेत की उमराळे, करमाळे, बोळिंजसारखी गावे महानगरपालिकेतून वगळणे चूक आहे कारण ती महानगरपालिकेच्या हद्दीला जोडलेली आहेत; उद्या लेखक असेही म्हणेल की काश्मीर पाकिस्तानच्या हद्दीला जोडलेले आहे तेव्हा त्याचा समावेश पाकिस्तानमध्ये व्हावा. लेखक या गावातील लोकांच्या भावनेचा बिलकुल विचार करत नाहीयेत. या लोकांनी अगोदरच ग्रामसभेद्वारे आपला विरोध दर्शवला आहे आणी जर का पुन्हा एकदा जनमत चाचणी घेतली तर खरे चित्र आपणासमोर येईल.
आमदार विवेक पंडित हे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देत आहेतच, वसईतील नवीन व सुस्थितीतील रस्ते आपणास हेच दर्शवत आहेत. मात्र त्यांनी हे आंदोलन थांबवावे आणी फक्त या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे हे कोणते ग्रामस्थ लेखकांना सांगताहेत हाच प्रश्न आहे. लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते की नाही याची विचारणा १० वर्षात केली नाही असे लेखक म्हणताहेत मात्र गेल्या १० वर्षात नव्हे तर मागील २० वर्षांपासून वसईत कोणाची सत्ता होती याच लेखकांना विसर पडलेला दिसतोय.
सर्व राष्ट्रीय आणी स्थानिक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामान्य नागरिक एकत्र येऊन हा लढा देत असताना तो फक्त एका विशिष्ठ समाजाचा आहे असे लेखक कुठल्या आधारावर म्हणताहेत हे कृपया स्पष्ट करावे.
आणी हो वसई हा तथाकथित हरित पट्टा नाही आहे, वसईसारखा हिरवागार प्रदेश आपणास शोधूनही सापडणार नाही. जर आपणास ह्याची खात्री करून घ्यायची असेल तर जरूर वसईस भेट दया, आम्ही आपले आदरातिथ्य जरूर करू. वसई पाहून आपले मतपरिवर्तनच नव्हे मनपरिवर्तनदेखील होईल याची आम्ही खात्री देतो.

गेट वेल सून..!!!